यावल – यावल तालुक्यातील दहिगाव गण हे महिला सर्वसाधारण आरक्षणाचे मतदारसंघ असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. यशश्री देवकांत पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी जनतेतून आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
सामाजिक कार्याचा भक्कम पाया सौ. यशश्री पाटील या सचिव – छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन, यावल तसेच माजी सदस्य – संजय गांधी निराधार समिती, यावल या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी झटत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण, कला आणि क्रीडा या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या नेतृत्वात फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले असून, निराधार समितीच्या माध्यमातून गरजू, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
जनसामान्यांसाठी अहोरात्र प्रयत्न तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग, शिबिरांचे आयोजन आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत अनेकांना थेट मदत मिळवून दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
विश्वासार्ह आणि शिक्षित नेतृत्व सौ. यशश्री पाटील यांना त्यांच्या कार्यामध्ये पती ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांचेही खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे. हे दाम्पत्य उच्चशिक्षित, प्रामाणिक आणि सामाजिक जाणिवेने कार्यरत आहे. शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
जनतेचा आवाज – “योग्य उमेदवार म्हणजे सौ. यशश्री पाटील” सामान्य जनतेत सौ. पाटील यांच्या कार्याची दखल घेतली जात असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला दहिगाव गणातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महिलांमध्ये तसेच युवकांमध्ये त्यांच्या नावाबाबत विशेष उत्साह आहे. “जनहितासाठी समर्पित आणि विकासाचे स्वप्न साकार करू शकणारी योग्य महिला उमेदवार म्हणजेच सौ. यशश्री देवकांत पाटील,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
पक्षाने संधी दिल्यास, ती संधी सोनेरी यशात परिवर्तीत करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारीची संधी मिळावी हीच दहिगाव गणातील जनतेची अपेक्षा आहे. संधी मिळाल्यास, ती संधी सोने करून, जनतेच्या विश्वासास पात्र राहण्याचा दृढनिश्चय या दांपत्याने व्यक्त केला आहे.





