• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

महाराष्ट्रात थंडी ओसरली; ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वाढली

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 24, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात थंडी ओसरली; ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वाढली
बातमी शेअर करा !

जळगाव – महाराष्ट्रात कडाक्याची थंडी ओसरत असून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी ७ अंशांवर घसरलेले किमान तापमान आता १४ अंशांच्या वर गेले आहे. तर कमाल तापमान तिशीपार पोहोचले असून दुपारी उकाड्याची तीव्रता वाढत आहे.

जळगावसह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला होता. मात्र अलीकडच्या दिवसांत तापमानातील वाढ स्पष्टपणे जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो पुढे चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होतो आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण आणि दुपारी वाढणारा उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामानातील या बदलामुळे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस हवामान अशीच स्थिती राहणार असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ऐन हिवाळ्यात पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक हैराण आहेत.

राज्यात कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?

हवामान विभागानुसार आज खालील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे:

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, राज्यात थंडी कमी होत असताना अचानक वाढलेला उकाडा आणि संभाव्य हलका पाऊस यामुळे हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिरन करणवाल मॅडम यांची महत्त्वाची सूचना

जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिरन करणवाल मॅडम यांची महत्त्वाची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News