• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, September 19, 2025
Dainik Vyagh Rashuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyagh Rashuryam Live News
No Result
View All Result

सीबीएसई बोर्ड परीक्षेत मोठा बदल : दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित नवी पद्धत लागू

नववी-अकरावीत निवडलेले विषय दहावी-बारावीपर्यंत कायम; ७५% उपस्थिती व अंतर्गत मूल्यमापन अनिवार्य

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 16, 2025
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सीबीएसई बोर्ड परीक्षेत मोठा बदल : दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित नवी पद्धत लागू
बातमी शेअर करा !

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बोर्ड परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. म्हणजेच, कोणत्याही विषयाची बोर्ड परीक्षा द्यायची असल्यास विद्यार्थ्यांना तो विषय सलग दोन वर्षे शिकणे बंधनकारक असेल.

दोन वर्षांचा अभ्यासक्रम कसा असेल?
सीबीएसईच्या या नव्या नियमामुळे, नववीत विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय दहावीतही शिकणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने नववीमध्ये ‘फॅशन डिझाइनिंग’ किंवा ‘पेंटिंग’सारखे पर्यायी विषय निवडले असतील, तर त्याला तेच विषय दहावीमध्येही कायम ठेवावे लागतील. दहावीत हे विषय बदलता येणार नाहीत. हाच नियम अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू राहील.

शिक्षण धोरण-२०२० नुसार बदल
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी सांगितले की, हे बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार करण्यात आले आहेत. याचा उद्देश शिक्षण पद्धती अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवणे आहे.

उपस्थिती आणि अंतर्गत मूल्यमापन महत्त्वाचे
या नवीन नियमांव्यतिरिक्त, बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. तसेच सर्व विषयांचे अंतर्गत मूल्यमापन करणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. जर विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिल्यास, त्याचे अंतर्गत मूल्यमापन होणार नाही आणि त्याचा निकालही घोषित केला जाणार नाही. या नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक पुनरावृत्ती श्रेणीमध्ये ठेवले जाईल. सीबीएसईने सर्व शाळांना इशारा दिला आहे की, बोर्डाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही नवीन विषय सुरू करू नये. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शाळांनी अधिक खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना नववी आणि अकरावीमध्ये विषय निवडताना अधिक विचार करावा लागेल, कारण एकदा निवडलेले विषय पुढील दोन वर्षे कायम राहणार आहेत.

बातमी शेअर करा !
Next Post
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदासाठी भरती सुरू; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदासाठी भरती सुरू; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२,२९१ कोटींच्या रस्ते प्रकल्पावर संशय; महाजनांचा अंदाजपत्रक तपासणीचा आदेश

२,२९१ कोटींच्या रस्ते प्रकल्पावर संशय; महाजनांचा अंदाजपत्रक तपासणीचा आदेश

September 19, 2025
बीकेसी ॲपल स्टोरसमोर आयफोन 17 साठी प्रचंड गर्दी; किंमती जाहीर

बीकेसी ॲपल स्टोरसमोर आयफोन 17 साठी प्रचंड गर्दी; किंमती जाहीर

September 19, 2025
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट परेड स्पर्धा

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट परेड स्पर्धा

September 19, 2025
‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी अनिवार्य; दोन महिन्यांची मुदत

‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी अनिवार्य; दोन महिन्यांची मुदत

September 19, 2025
Load More
Dainik Vyagh Rashuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News