• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

मराठा समाज आरक्षण पुन्हा न्यायालयाच्या दारात

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 17, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मराठा समाज आरक्षण पुन्हा न्यायालयाच्या दारात
बातमी शेअर करा !

मुंबई : इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाला आक्षेप घेत दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिका शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि अ‍ॅड. विनीत धोत्रे यांनी दाखल केल्या असून, त्यावर १८ व २५ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मुंबईत आंदोलन छेडल्यानंतर सरकारवर दबाव निर्माण झाला. त्यानंतर हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींचा आधार घेत राज्य सरकारने मराठा समाजाला ‘कुणबी’ किंवा ‘मराठा-कुणबी’ व ‘कुणबी- मराठा’ प्रमाणपत्रे देण्यासंबंधीचा अध्यादेश काढला, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या अध्यादेशाला स्थगिती देऊन तो रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, मराठा समाज हा मागास नसून प्रगत आहे. कुणबी आणि मराठा हे दोन स्वतंत्र वर्ग असून ते समान नाहीत, असा निष्कर्ष यापूर्वी खत्री आयोग, बापट आयोग, मंडल आयोग आणि बी. डी. देशमुख समितीने दिला होता. तसेच राष्ट्रीय मागास वर्ग आयोगानेही १९९९ मध्ये झालेल्या विस्तृत सुनावणीनंतर मराठा व कुणबी वेगळेच असल्याचे स्पष्ट केले होते.

तरीदेखील राज्य सरकारने मागील दोन वर्षांत विविध अध्यादेशांद्वारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला असून, जात प्रमाणपत्रे जारी करण्याची तरतूद केली. मात्र, सरकारचा हा निर्णय बेकायदा असून केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठीच हा पाऊल उचलण्यात आला असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
जीएसटीमुळे ऑगस्टमधील कारची मागणी घटली

जीएसटीमुळे ऑगस्टमधील कारची मागणी घटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News