• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

राज्यात १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 17, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
राज्यात १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
बातमी शेअर करा !

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आज (१७ सप्टेंबर) रोजीही राज्यातील १९ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई व कोकणात मुसळधार
मुंबईत आज ढगाळ वातावरण राहून काही भागांत जोरदार सरी कोसळतील. कमाल तापमान २९ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूरला अलर्ट नसला तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.

मराठवाडा
या विभागातील सर्व आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासोबतच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र व विदर्भ
नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
विदर्भात अमरावती, नागपूर आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी पडतील.

पावसामागचे कारण
हवामान खात्यानुसार विदर्भ-तेलंगणा सीमेवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
कोल्हापूरात दुर्मिळ घटना; म्हशीने दिला दोन तोंडी रेडकाला जन्म

कोल्हापूरात दुर्मिळ घटना; म्हशीने दिला दोन तोंडी रेडकाला जन्म

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News