• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

‘शेतकरी देशासाठी महत्त्वाचे, पण असं नाही की…’; आता त्या शेतकऱ्यांना होणार अटक

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 18, 2025
in राष्ट्रीय, ताज्या बातम्या
0
‘शेतकरी देशासाठी महत्त्वाचे, पण असं नाही की…’; आता त्या शेतकऱ्यांना होणार अटक
बातमी शेअर करा !

नवी दिल्ली : “शेतकरी देशासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांच्या श्रमांमुळे आपल्याला अन्न मिळते; पण याचा अर्थ असा नाही की पर्यावरणाचा ऱ्हास सहन केला जाईल,” अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भूमिका स्पष्ट केली. शेतात पिकांचे खुंट व पेंढा (पाचट) जाळून प्रदूषण निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाईच नव्हे, तर अटकही केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. “काही शेतकऱ्यांना तुरुंगात टाकल्यास योग्य संदेश जाईल,” असे निरीक्षण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने नोंदवले.

दिल्लीशेजारच्या राज्यांतील प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणांतील रिक्त पदे भरण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान ही भूमिका घेण्यात आली. दरवर्षी दिवाळीनंतर राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण टोकाला पोहोचते. पंजाब व हरियाणातील शेतकरी पराली जाळतात, त्यातून निर्माण होणारा धूर फटाक्यांच्या धुरासह मिसळून हवा धोकादायक बनवतो. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोग (सीएक्यूएम), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान व पंजाब या राज्यांच्या मंडळांना तीन आठवड्यांत प्रदूषण नियंत्रणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयमित्र अपराजिता सिंह यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना पराली जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी अनुदान आणि यंत्रसामग्री पुरवली गेली आहे. तरीही २०१८ पासूनचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत.”

दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या आढावा बैठकीत वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवणे, कचरा व्यवस्थापनासाठी ऑनलाइन प्रणाली अंमलात आणणे आणि पराली जाळण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधणे यावर भर देण्यात आला.

बातमी शेअर करा !
Next Post
Gameskraft घोटाळा : CFO च्या F&O ट्रेडिंगमुळे 250 कोटींचा फटका, गेमिंग इंडस्ट्री हादरली!

Gameskraft घोटाळा : CFO च्या F&O ट्रेडिंगमुळे 250 कोटींचा फटका, गेमिंग इंडस्ट्री हादरली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News