• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
बातमी शेअर करा !

मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार असून, ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येतील. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने निवडणूक विभागाने तयारीला गती दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादीच या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय प्रारूप यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. या यादीवर हरकती नोंदवण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदारयादी व मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर केली जाईल.

मतदारयादी तयार करताना विधानसभेच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. मात्र या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे किंवा दुरुस्ती करणे अशी प्रक्रिया केली जात नाही. हरकतींच्या आधारे केवळ विभाजनाच्या वेळी झालेल्या तांत्रिक चुका दुरुस्त केल्या जातात. उदाहरणार्थ, मतदाराचा निवडणूक विभाग चुकीचा लागणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नसणे इत्यादी.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पार पाडाव्यात. तसेच प्रभागांचे सीमांकन ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पूर्ण करणे आणि निवडणुका घेण्यासाठी आवश्यक मशिन्स व कर्मचारी संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना त्वरित कळविण्याचे निर्देशही दिले आहेत.

बातमी शेअर करा !
Next Post
विवरेसह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

विवरेसह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News