यावल – शहरातील विश्वज्योती चौक येथे विश्वज्योती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने ‘आयुष्मान भारत कार्ड’ नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ७५ कुटुंबांची नोंदणी यामध्ये करण्यात आली.
हे शिबिर बुधवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडले. यावेळी नागरिकांची मोफत नोंदणी करण्यात आली असून लवकरच ओळखपत्रांचे वितरणही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शिबिराला पुरवठा अधिकारी अभिमन्यू चराटे, अकबर तडवी, दिलीप नवे, शोभा बडगुजर, संजीदा बी., आसिफ खान, नितीन माहुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष गोपाल चौधरी यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून या उपक्रमाला विशेष सहकार्य केले.




