यावल – जळगाव राज्याचे जलसंपदा गिरीष महाजन आणि त्यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी यावल तालुक्यात सातपुड्यातील पाल, यावल अभयारण्यातील गाडऱ्या जामन्या, गारखेडा, उसमळी, लंगडया अंबा परिसरातील दुर्गम भागातील वाड्यापाड्यावरील आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली.
आदिवासी पाड्यावर पोहोचल्यावर बांधवांनी नृत्य करीत त्यांचे स्वागत केले. उसमळी येथे महाजन कुटुंबाने रात्री आदिवासी पाड्यावर मुक्काम केला. आदिवासीं सोबत स्नेहभोजन घेतले. ज्या ठिकाणी वाहनाने येणे जाणे अडचणीचे आहे, तसेच मोबाईलची रेंज नाही अशा दुर्गम भागात त्यांनी मुक्कामी होते. यावल रावेर गानाचे आमदार अमोल जावळे, केतकी ताई पाटील, राकेश फेगडे यांच्यासाह अनेक कार्यकर्ते उपस्तित होते,यावेळी त्यांनी आदिवासी समवेत चर्चा केली. मंत्री महाजन गेल्या तीन वर्षापासून आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी करीत आहेत.
गेल्या वर्षी त्यांनी पालघर भागातील आदिवासी पाड्यावर जावून दिवाळी साजरी केली. “सरकारनामा’शी बोलतांना ते म्हणाले, की आसराबरी आणि धुलिपाढा या गावांना दत्तक घेऊन काया पालकट करणार असे आश्वासन भाऊंनी दिले, दिवाळी म्हणजे काय आदिवासींना माहीत नसते. दिवाळीला सगळीकडे उजेड असतो. मात्र, आदिवासी पाड्यावर दिवाही लागत नाही. त्यामुळे आपण आदिवासी पाड्यावर जावून त्यांच्या समवेत फराळ करून दिवाळी साजरी करतो, विशेष म्हणजे सणाला आदिवासी लोक जे भोजन करतात तेच भोजन त्यांना करावयास लावून त्यांच्यासमवेत आदिवासी भोजनाचा आनंद घेतो. त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यात आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो.





