• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 16, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

राज्यात भाजपची ताकद वाढली — बीड, सोलापूर आणि रायगडमध्ये ठाकरे गट व राष्ट्रवादीला मोठे खिंडार

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 30, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
बातमी शेअर करा !

बीड – राज्यात भाजपने पुन्हा एकदा आपले राजकीय बळ वाढवले असून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांना मोठे खिंडार बसले आहे. बीड, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणेच बदलली आहेत.

बीड जिल्ह्यातील माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे गटाला रामराम देत भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई मतदारसंघात ही मोठी घडामोड ठरली आहे. बदामराव पंडित यांनी पुतणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका करत, “गेवराईची जनता मलाच खरी आमदार मानते,” असा दावा केला. तसेच भविष्यात भाजपाची राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नाही आणि तेच पुढील विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यातील दोन माजी आमदार आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, तसेच लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटास मोठा फटका बसला आहे.

तर रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड आणि महाड, पोलादपूर, माणगाव भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या तिहेरी राजकीय प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद राज्यभर वाढताना दिसत आहे, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसते आहे.

बातमी शेअर करा !
Next Post

पाल येथे शाळा परिसरात टवाळखोरांचा उपद्रव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News