• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

देशात 4 नवीन कामगार कायदे लागू

कर्मचाऱ्यांना नेमका फायदा काय?, जाणून घ्या एका क्लिकवर

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 22, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
देशात 4 नवीन कामगार कायदे लागू
बातमी शेअर करा !

नवी दिल्ली – 22 नोव्हेंबर : केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेत देशातील कामगार क्षेत्रात नवे नियम लागू केले आहेत. चार नवीन कामगार संहिता तत्काळ लागू केल्यामुळे मागील 29 जुन्या कामगार कायद्यांना हटवण्यात आलंय. दरम्यान, या बदलामुळे देशभरातील सर्व कामगारांना कायदेशीर किमान वेतन मिळणे बंधनकारक झाले आहे. तसेच वेळेवर पगार देणे, ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन देणे आणि महिलांना रात्रपाळीत सुरक्षित वातावरणात काम करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या कामगार कायद्यातील सुधारणांमुळे भारतातील साधरणतः 40 कोटी कामगारांना फायदा होणार आहे.

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा –
पहिल्यांदाच ‘गिग वर्क’, ‘प्लॅटफॉर्म वर्क’ आणि ‘ॲग्रिगेटर’ सारख्या शब्दांची स्पष्ट व्याख्या सरकारने कायद्यात केली आहे. त्याचबरोबर कामगारांचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी स्वतंत्र ‘व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य मंडळ’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांच्या तक्रारी जलदगतीने सोडवण्यासाठी दोन सदस्यीय न्यायाधिकरण तयार होणार आहे. याबाबतची अधिसूचना कामगार मंत्रालयाने जारी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली.
नव्या संहितांमुळे कामगार कायदे आता देशभर एकसमान झाले आहेत. यामुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा हमीशीर मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर सांगितले. उद्योगांना अधिक गती मिळेल, नवे रोजगार तयार होतील आणि कामगारांना अधिक अधिकार प्राप्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना नेमका फायदा काय? –
तसेच मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 40 वर्षांवरील कामगारांना मोफत आरोग्य तपासणी, धोकादायक उद्योगात एक कर्मचारी असला तरी ईएसआयसीची सक्ती आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखे सर्व लाभ देणे बंधनकारक असे नियम यात समाविष्ट आहेत.
ग्रॅज्युएटीसंदर्भातही मोठा बदल करण्यात आला आहे. आता एका वर्षाच्या सेवेनंतर कामगाराला ग्रॅज्युएटी मिळू शकणार आहे. पत्रकार, डिजिटल मीडिया कर्मचारी, डबिंग कलाकार, स्टंटमॅन यांचाही या कायद्यांच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक कामगार सामाजिक सुरक्षा योजनेखाली येणार आहेत.

बातमी शेअर करा !
Next Post
विवरे येथे रास्ता रोको आंदोलन

विवरे येथे रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News