• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

उत्तरेकडील थंड लहरींनी जळगाव थंडावले; पारा ९.४ अंशांवर, पुढील १५ दिवस कडाक्याची थंडी कायम

vyaghra shuryam by vyaghra shuryam
December 9, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
थंडीचा अचानक ब्रेक : जळगावात तापमान झपाट्याने वाढून उकाड्याची लाट
बातमी शेअर करा !

उत्तरेकडील शीत लहरी पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून जळगावातही गारठ्याची कडाक्याची अनुभूती होत आहे. ७ डिसेंबरला जळगावचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तापमानात तब्बल ३ अंशांची घसरण झाली आणि रात्रीचा पारा थेट ९.४ अंश सेल्सिअसवर आला. त्यामुळे जळगावकर अक्षरशः थरथर कापू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात किमान तापमान १२ अंशांच्या आसपास होते. रात्री व पहाटेच्या वेळी थंडी बोचरी जाणवत असली तरी दुपारपाठोपाठ उन्हाची चटका देणारी ऊब जाणवत होती. सोमवारी किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ अंश नोंदले गेले. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे थंडीचा प्रभाव आणखी वाढल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.

हवामान खात्यानुसार, पुढील १५ दिवस जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना पूर्णतः कोरडा राहणार असून या काळात एक ते दोन वेळा थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

थंडीचा फायदा रब्बी पिकांना

कडाक्याची ही थंडी रब्बी हंगामासाठी वरदान असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः हरभरा आणि गहू या पिकांना थंड हवामानाचा मोठा फायदा होतो. गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदा कोरडी हवा आणि सातत्याने टिकणारी थंडी यामुळे दोन्ही पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
जळगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह; बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघड — 10 जणांवर गुन्हा, पती अटक

जळगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह; बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघड — 10 जणांवर गुन्हा, पती अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News